संवेदना प्रकल्प येथे ऋषी अष्टावक्र यांची जयंती साजरी करण्यात आली.
संवेदना प्रकल्प येथे ऋषी अष्टावक्र यांची जयंती साजरी करण्यात आली.
आज दिनांक २२/०९/२०२१, बुधवार रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर अंमलबजावणी अभिकर्ता रा स्व संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) संचलित संवेदना प्रकल्प येथे ऋषी अष्टावक्र यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र इन्स्टीट्यूट ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्या डॉ पल्लवी जाधव दांगड यांच्या हस्ते संत अष्टावक्र यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जयंती चे आवचित्य साधून दिव्यांग विद्यार्थ्यांनी कु. गायत्री तळसे हीला शैक्षणिक साहित्य देण्यात आले.यावेळी डीडीआरसीचे कार्यवाह श्री. डाॅ योगेश निटुरकर, डॉ साक्षी थोरात, बस्वराज पैके, सौ.जयश्री माने ,कु. स्वेता ढवळे, कु. प्रेरणा गोडसेलवार, श्री. लक्ष्मण वाघमारे, श्री. आत्माराम पळसे, दिव्यांग व्यक्ती व त्यांचे पालक उपस्थित होते.
या वेळी सौ. जयश्री माने यांनी अष्टावक्र ऋषी यांचा सविस्तर परिचय करून दिला. ऋषी अष्टावक्र शरीराने आठ ठिकाणी वाकडे होते त्यामुळेच त्यांचे नाव अष्टावक्र पडले. शरीराने जरी वाकडे असले तरी त्यांचे ज्ञान प्रगाढ व विलक्षण होते. त्यांचे वडील ऋषी कहोड हे मोठे वेद पंडित होते. एकदा जनक राजाच्या दरबारात ब्रह्मज्ञानाची चर्चा सुरू होती तिथे मोठमोठे ज्ञानी आले होते अष्टावक्र सुद्धा दरबारात गेले पंडितांनी त्यांना पाहिले त्यांच्या वाकड्या शरीरामुळे त्यांचे चालणे सुद्धा मोठे विचित्र वाटत असे. सारे पंडित यांना पाहून मोठमोठ्याने हसू लागले. अष्टावक्र ऋषी सुद्धा त्या पंडितांना पाहून हसू लागले. जनक राजास हे विचित्र वाटले. व त्यांनी अष्टावक्र ऋषींना विचारले की बाकी सगळे का असतात ते मला कळले, हे बालक तु का हसत आहेस. बारा वर्षांचे बालक असलेले अष्टावक्र ऋषी म्हणाले हे राजन, मी यासाठी हसलो की चांबड्याची पारख करणाऱ्यांच्या सभेत ब्रह्मचर्चा व सत्याचा निर्णय होत आहे . हे ऐकून सभेत एकदम शांतता पसरली. सर्व महापंडित क्रोधित झाले. राजा जनकाने विचारले बालक तुला काय म्हणायचे आहे ? अष्टावक्र जराही विचलित न होता बोलले अगदी सरळ गोष्ट आहे, की यांना माझे वाकडे शरीर म्हणजेच माझी केवळ चांमडी दिसत आहे, पण मी दिसत नाही हे सगळे चांमड्यांचे पारखी आहेत राजन घागर फुटकी असल्याने कधी आकाश फुटत असते का? माझे शरीर वाकडे आहे पण मी तर वाकडा नाही जो या शरीरात साक्षीरुपी स्थित आहे त्याकडे तरी बघा . वयाने लहान पण ज्ञानाचे ज्ञानाने महान अशा अष्टावक्रा चे ज्ञानी वचन एकूण सर्व पंडित लज्जित झाले त्यांना त्यांच्या अहंकारावर व मूर्खपणावर मोठा पश्चाताप झाला. अष्टावक्र यांनी लिहिलेली गीता अध्यात्म विज्ञानाचा एक अद्वितीय ग्रंथ आहे. ज्ञान कसे प्राप्त होते? मुक्ती कशी मिळेल? वैराग्य कसे मिळू शकते? हे तीन शाश्वत प्रश्न आहेत जे प्रत्येक युगात परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जिज्ञासू लोक विचारतात. राजा जनकानेही ऋषी अष्टावक्रानां हेच तीन प्रश्न वेगळ्या रूपात विचारले आहेत व या दोघांतील संवाद अष्टावक्र गीता नावाने प्रसिद्ध आहे. त्या संवादास काही ज्ञांनीनी अष्टावक्र संहिता असेही संबोधले आहे. अष्टावक्र यांनी राजा जनकाच्या सगळ्या प्रश्नांचे एकच उत्तर दिले आहे 'साक्षीभाव' अष्टावक्र म्हणतात *"साक्षी बना" त्या द्वारेच मिळेल ज्ञान , मुक्ती व साधेल वैराग्य. बघणारे व्हा. जे होतंय ते होऊ द्या. त्यात जराही बिघाड करू नका. तुम्ही न शरीर आहात न मन. तुम्ही तटस्थपणे पाहणारे आहात. माणसाने स्वतःला देहापासून मनापासून वेगळेच जाणले व मी कर्ता भोक्ता नाही असे जाणल्यास त्यास त्याचे खरे स्वरूप दिसून तो या संसार बंधनातून मुक्त होईल.*
ते सांगतात *परमेश्वराला कुठे बाहेर शोधू नका. तो तुमच्यातच विराजमान आहे.*